स्वातंत्र्य दिन
सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात
आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत
राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या
साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला
देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने
म्हणाले, ''मध्यरात्री
बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य
संपादन केले.....! स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू
लागला. 'मी आता तुमच्यातील एक' अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या
राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. संसदभवनावर 'युनियन जॅक' ऐवजी 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे
सुरू झाले.
मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला? दीडशे वर्षे राज्य कसे केले? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी 'करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद सेने' नेही अभूतपूर्व कामगिरी केली.
विषमतेने व दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासागर, लोकहितवादी, दयानंद सरस्वती, म. फुले, न्या, रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला, लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आ वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत. मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.
मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला? दीडशे वर्षे राज्य कसे केले? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी 'करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद सेने' नेही अभूतपूर्व कामगिरी केली.
विषमतेने व दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासागर, लोकहितवादी, दयानंद सरस्वती, म. फुले, न्या, रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला, लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आ वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत. मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नागपंचमी
पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी _____ सोनपिवळ्या ऊन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि
हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती _____ अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण म्हणजे शुद्धपंचमीला येणारी नागपंचमी! भगवान शंकराच्या
गळ्यात आणि मस्तकावर नाग आहे. विष्णू हा तर 'शेषनागावर' प्रत्यक्ष शयन करतो. म्हणून या दोन्ही देवतांच्या
पूजाविधीत नागपूजाही महत्त्वाची समजली जाते. वासुदेव 'बाळ' कृष्णाला मथुरेतून गोकुळाकडे नेत होता, तेव्हा पाऊस लागू नये म्हणून नागाने फणा उभारून
कृष्णाचे संरक्षण केले तर यमुनेच्या डोहातील कालिया सर्पाची पुरी खोड मोडून कृष्ण
नागाच्या फण्यावरुन सुखरूप वर आला, हे पाहून सर्पानेच कृष्णाचे रक्षण केले असे
सर्वांना वाटले. त्याप्रीत्यर्थ नागराजाची पूजा झाली ती श्रावणपंचमीला.
हा मुख्य म्हणजे स्त्रियांचा सन! खूप खूप खेळण्याचा, नाचण्या बागडण्याचा, एकत्र येण्याचा हा सण. या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नाही, केस विंचरायचे नाहीत, काही तळायचे नाही. चिरायचे नाही, भांडणे टाळायची तर सासरच्या मुली माहेरी आवर्जून आणायच्या हा प्रघात आहे.
नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागाची वा चित्राची दुर्वा, फुले, दूध, लाह्या वाहून पूजा करतात. काहीजण टोपलीतल्या खऱ्या नागाची दूध वाहून पूजा करतात. खेडेगावी तर शेतातल्या वारुळांची गाणी म्हणत बायका मुली पूजा करतात व म्हणतात.
'चल ग सये वारुळाला, पुजायाला नागोबाला!' महाराष्ट्रात बत्तीस शिराळा येथील शेतकरी दरवर्षी शेकडो नाग पकडून त्यांची पूजा करतात व पुन्हा सुखरूपपणे शेतात सोडून देतात. शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांना खाऊन नाग शेतकऱ्यांचा मित्र बनला आहे. पण नागपुजेच्या दिवशीच नागांची मोठ्या प्रमणात हत्या सुरू झाली आहे. त्याचे विषारी दात पडणे, तोंड शिवणे, नाग, सर्पांची कातडी विकणे इ. क्रूर प्रकार पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास मदत करीत आहेत. नागाचे भक्ष्य उंदीर, बेडूक! तरीही दुधाने त्याला पुजून आपण बधिरता आणतो. नाग पुंगीच्या आवाजाने नाही तर हलणाऱ्या वस्तूकडे पाहून फणा हलवतो. नाग डुख धरतो हे खरे नाही.
साप बदला घेऊ शकत नाही. घडलेल्या गोष्टींची स्मृती राहील अशा प्रकारची योजना सापाच्या मेंदूत नाही.भारतात सापाच्या सुमारे २५० जाती आहेत. यापैकी सुमारे पन्नास एक जातीच विषारी आहेत. उदा. नाग, बंगारस, घोणस, फुरसे वगैरे. बिनविषारी सापांमुळे धोका नसतो पण तो ओळखू न-आल्यामुळे साप म्हणजे विषारीच व त्याचा दंश म्हणजे मृत्यूच! म्हणून तो ठेचलाच जावा ह्या विचारात बदल व्हायला हवा. आजकाल सर्व विषावर प्रतिविष उपलब्ध आहे. तेव्हा मांत्रिकांचा सल्ला न घेता सर्पदंशावर डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. निसर्गात संतुलन राखणाऱ्या सर्पांच्या संरक्षणासाठी पर्यावरणवादी आता 'सर्प उद्याने' विकसित करीत आहेत. म्हणून आपणही 'सर्पमित्र' होऊया!
हा मुख्य म्हणजे स्त्रियांचा सन! खूप खूप खेळण्याचा, नाचण्या बागडण्याचा, एकत्र येण्याचा हा सण. या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नाही, केस विंचरायचे नाहीत, काही तळायचे नाही. चिरायचे नाही, भांडणे टाळायची तर सासरच्या मुली माहेरी आवर्जून आणायच्या हा प्रघात आहे.
नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागाची वा चित्राची दुर्वा, फुले, दूध, लाह्या वाहून पूजा करतात. काहीजण टोपलीतल्या खऱ्या नागाची दूध वाहून पूजा करतात. खेडेगावी तर शेतातल्या वारुळांची गाणी म्हणत बायका मुली पूजा करतात व म्हणतात.
'चल ग सये वारुळाला, पुजायाला नागोबाला!' महाराष्ट्रात बत्तीस शिराळा येथील शेतकरी दरवर्षी शेकडो नाग पकडून त्यांची पूजा करतात व पुन्हा सुखरूपपणे शेतात सोडून देतात. शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांना खाऊन नाग शेतकऱ्यांचा मित्र बनला आहे. पण नागपुजेच्या दिवशीच नागांची मोठ्या प्रमणात हत्या सुरू झाली आहे. त्याचे विषारी दात पडणे, तोंड शिवणे, नाग, सर्पांची कातडी विकणे इ. क्रूर प्रकार पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास मदत करीत आहेत. नागाचे भक्ष्य उंदीर, बेडूक! तरीही दुधाने त्याला पुजून आपण बधिरता आणतो. नाग पुंगीच्या आवाजाने नाही तर हलणाऱ्या वस्तूकडे पाहून फणा हलवतो. नाग डुख धरतो हे खरे नाही.
साप बदला घेऊ शकत नाही. घडलेल्या गोष्टींची स्मृती राहील अशा प्रकारची योजना सापाच्या मेंदूत नाही.भारतात सापाच्या सुमारे २५० जाती आहेत. यापैकी सुमारे पन्नास एक जातीच विषारी आहेत. उदा. नाग, बंगारस, घोणस, फुरसे वगैरे. बिनविषारी सापांमुळे धोका नसतो पण तो ओळखू न-आल्यामुळे साप म्हणजे विषारीच व त्याचा दंश म्हणजे मृत्यूच! म्हणून तो ठेचलाच जावा ह्या विचारात बदल व्हायला हवा. आजकाल सर्व विषावर प्रतिविष उपलब्ध आहे. तेव्हा मांत्रिकांचा सल्ला न घेता सर्पदंशावर डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. निसर्गात संतुलन राखणाऱ्या सर्पांच्या संरक्षणासाठी पर्यावरणवादी आता 'सर्प उद्याने' विकसित करीत आहेत. म्हणून आपणही 'सर्पमित्र' होऊया!
==============================================================================